शेतकरी क्रांती संघटना ठाकरे गटात विलीन:​​​​​​​रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला; मुख्यमंत्री हतबल, जनतेला वाली उरला नाही - उद्धव ठाकरे

शेतकरी क्रांती संघटना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विलीन झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हतबल मुख्यमंत्री असल्याची टीका केली. मी एवढे हतबल मुख्यमंत्री पाहिले नाही. कुणी कुणाला जाबच विचारू शकत नाही. एखाद्या गोष्टीत एखाद्याला त्रास द्याचा आणि त्यानंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण तुमचे कसे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचे असा प्रकार सध्या सुरू आहे, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे शेतकरी क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, अनेकजण आपली शिवसेना संपवायला निघालेत. उद्धव ठाकरेंना संपवण्यास निघालेत. पण त्यानंतरही त्यांना एक प्रश्न पडला आहे की, एवढे सगळे करून उद्धव ठाकरे व त्यांची शिवसेना संपत का नाही? त्यांना समजत नाही की, सगळीच माणसे काही पैशांनी विकली जात नाहीत. काही गद्दार पैशांनी विकले जाऊ शकतात. पण निष्ठावंत विकले जाऊ शकत नाहीत. म्हणूनच माझ्यासोबत माझे सगळेच जुने सहकारी आहेत. आपण ज्या लोकांना मोठे केले ते आपल्याला सोडून गेले. पण ज्यांनी त्या लोकांना मोठे केले ते माणसे माझ्यासोबत आहेत. आपण या आयुष्यात येऊन नेमके करायचे काय? तुम्ही नेमके कशासाठी शिवसेनेत येत आहात? तुमच्या शेतकरी संघटनेचे एक स्वतंत्र अस्तित्व होते. त्यानंतररही तुम्ही माझ्याकडे व शिवसेनेकडे असे काय पाहिले की, तुम्ही तुमची अख्खी संघटना शिवसेनेत विलीन केली? माझ्या मते, आयुष्यात सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही. अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद मिळाले मी प्रामाणिकपणे सांगतो, मला अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. माझ्या काळात नागपूरचे एकमेव अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे येऊन आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली नव्हती. पण मी माझ्या भावनेला जागून शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्यापेक्षा त्यांना कर्जमुक्ती दिली, असे उद्धव ठाकरे म्हणालो. ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जे काही घडले ते अनाकलनीय आहे. आपल्याला कुणालाही असे वाटले नव्हते की, असा वेगळा निकाल लागेल. पण मला खात्री आहे की, आपल्या महाराष्ट्रातील जनता, माझ्या माता-भगिनी एवढी उफराटी नाही. आपण एवढी सगळी कामे केली, त्यानंतरही ते असे काही करणार नाहीत. त्यामुळे काहीतरी गडबड घोटाळा नक्की झाला आहे. आता हे सर्व घोटाळे एकेक बाहेर येत आहेत. लाडक्या बहिणींमध्ये किती पापी घुसलेत? ते कुणी घुसवले? पैसे कुठे गेले? आजच बातमी आहे की, लाडक्या बहिणींसाठी पैसे वळवण्यात आलेत. थोडक्यात हे सर्वकाही ओढून ताणून सुरू आहे. आत्ता बहिणींची सुद्धा आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष घातले पाहिजे. महायुतीने दाखवलेल्या स्वप्नाला काही लोक भुलले असतील, पण निवडणूक झाल्यानंतर आता त्यांचे खरे रुप समोर येत आहे. आपण कर्जमुक्तीचे आंदोलन सुरूच ठेवले पाहिजे. फडणवीसांची नितीमूल्य समिती कुठे गेली? उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या काळात आपण आरोप झाले की मंत्र्यांचे राजीनामे घेत होतो. पण आता स्थिती वेगळी आहे. आम्ही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा होती. पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेली नितीमूल्य समिती कुठे गेली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने राजीनामा घेण्याऐवजी मंत्र्यांना समज दिली. त्यांना सोडून दिले. आता कितीही घोटाळे केले तरी हरकत नाही. धुळ्यात पकडण्यात आलेल्या रोख रकमेचा तपास थंडावला. बॅगा घेऊन बसलेल्या लोकांची काहीही चौकशी झाली नाही. रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला उद्धव ठाकरे यांनी यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या कृषिखात्यावरून झालेल्या उचलबांगडीवरही भाष्य केले. आज तर एक कार्टुन आले आहे. कदाचित आता रमी व तीन पत्तीला आता ऑलिम्पिकमध्ये मागणी होईल. कारण, पहिल्यांदा जो ज्याचा विषय आहे, त्याला ते खाते देण्यात आले आहे. नाहीतर त्यांचे (माणिकराव कोकाटे) कृषिखाते नव्हतेच. ते केवळ शेतकऱ्यांची थट्टा व मस्करी करत होते. पण आता रमी खेळणारा माणूस क्रीडामंत्री झाला. अशा पद्धतीने हे सरकार सुरू आहे. आपल्याला या लोकांच्या भ्रष्टाचाराचा विद्रुप चेहरा लोकांपुढे न्यावा लागेल. याविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आपण राज्यात लवकरच हे आंदोलन छेडणार आहोत. तेव्हा सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. एवढा हतबल मुख्यमंत्री पाहिला नाही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. लाडक्या बहिणींची फसवणूक थांबली पाहिजे. मी एवढे हतबल मुख्यमंत्री पाहिले नाही. कुणी कुणाला जाबच विचारू शकत नाही. एखाद्या गोष्टीत एखाद्याला त्रास द्यायचा. त्यानंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण तुमचे कसे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे. आयुष्य समाधानाने सुरू असताना मुद्दामहून कुणाकडून तरी त्यांना त्रास द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे गेलात की सगळे मिटवून टाकायचे. या सगळ्या गोष्टींचा बुरखा आता फाटला आहे. तो आता लोकांपुढे आणण्याची गरज आहे. आज जनतेला कोणताही वाली उरला नाही. त्यामुळे जनतेशी प्रामाणिक राहणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

Aug 2, 2025 - 21:24
 0
शेतकरी क्रांती संघटना ठाकरे गटात विलीन:​​​​​​​रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला; मुख्यमंत्री हतबल, जनतेला वाली उरला नाही - उद्धव ठाकरे
शेतकरी क्रांती संघटना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विलीन झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हतबल मुख्यमंत्री असल्याची टीका केली. मी एवढे हतबल मुख्यमंत्री पाहिले नाही. कुणी कुणाला जाबच विचारू शकत नाही. एखाद्या गोष्टीत एखाद्याला त्रास द्याचा आणि त्यानंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण तुमचे कसे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचे असा प्रकार सध्या सुरू आहे, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे शेतकरी क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, अनेकजण आपली शिवसेना संपवायला निघालेत. उद्धव ठाकरेंना संपवण्यास निघालेत. पण त्यानंतरही त्यांना एक प्रश्न पडला आहे की, एवढे सगळे करून उद्धव ठाकरे व त्यांची शिवसेना संपत का नाही? त्यांना समजत नाही की, सगळीच माणसे काही पैशांनी विकली जात नाहीत. काही गद्दार पैशांनी विकले जाऊ शकतात. पण निष्ठावंत विकले जाऊ शकत नाहीत. म्हणूनच माझ्यासोबत माझे सगळेच जुने सहकारी आहेत. आपण ज्या लोकांना मोठे केले ते आपल्याला सोडून गेले. पण ज्यांनी त्या लोकांना मोठे केले ते माणसे माझ्यासोबत आहेत. आपण या आयुष्यात येऊन नेमके करायचे काय? तुम्ही नेमके कशासाठी शिवसेनेत येत आहात? तुमच्या शेतकरी संघटनेचे एक स्वतंत्र अस्तित्व होते. त्यानंतररही तुम्ही माझ्याकडे व शिवसेनेकडे असे काय पाहिले की, तुम्ही तुमची अख्खी संघटना शिवसेनेत विलीन केली? माझ्या मते, आयुष्यात सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही. अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद मिळाले मी प्रामाणिकपणे सांगतो, मला अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. माझ्या काळात नागपूरचे एकमेव अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे येऊन आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली नव्हती. पण मी माझ्या भावनेला जागून शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्यापेक्षा त्यांना कर्जमुक्ती दिली, असे उद्धव ठाकरे म्हणालो. ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जे काही घडले ते अनाकलनीय आहे. आपल्याला कुणालाही असे वाटले नव्हते की, असा वेगळा निकाल लागेल. पण मला खात्री आहे की, आपल्या महाराष्ट्रातील जनता, माझ्या माता-भगिनी एवढी उफराटी नाही. आपण एवढी सगळी कामे केली, त्यानंतरही ते असे काही करणार नाहीत. त्यामुळे काहीतरी गडबड घोटाळा नक्की झाला आहे. आता हे सर्व घोटाळे एकेक बाहेर येत आहेत. लाडक्या बहिणींमध्ये किती पापी घुसलेत? ते कुणी घुसवले? पैसे कुठे गेले? आजच बातमी आहे की, लाडक्या बहिणींसाठी पैसे वळवण्यात आलेत. थोडक्यात हे सर्वकाही ओढून ताणून सुरू आहे. आत्ता बहिणींची सुद्धा आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष घातले पाहिजे. महायुतीने दाखवलेल्या स्वप्नाला काही लोक भुलले असतील, पण निवडणूक झाल्यानंतर आता त्यांचे खरे रुप समोर येत आहे. आपण कर्जमुक्तीचे आंदोलन सुरूच ठेवले पाहिजे. फडणवीसांची नितीमूल्य समिती कुठे गेली? उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या काळात आपण आरोप झाले की मंत्र्यांचे राजीनामे घेत होतो. पण आता स्थिती वेगळी आहे. आम्ही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा होती. पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेली नितीमूल्य समिती कुठे गेली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने राजीनामा घेण्याऐवजी मंत्र्यांना समज दिली. त्यांना सोडून दिले. आता कितीही घोटाळे केले तरी हरकत नाही. धुळ्यात पकडण्यात आलेल्या रोख रकमेचा तपास थंडावला. बॅगा घेऊन बसलेल्या लोकांची काहीही चौकशी झाली नाही. रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला उद्धव ठाकरे यांनी यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या कृषिखात्यावरून झालेल्या उचलबांगडीवरही भाष्य केले. आज तर एक कार्टुन आले आहे. कदाचित आता रमी व तीन पत्तीला आता ऑलिम्पिकमध्ये मागणी होईल. कारण, पहिल्यांदा जो ज्याचा विषय आहे, त्याला ते खाते देण्यात आले आहे. नाहीतर त्यांचे (माणिकराव कोकाटे) कृषिखाते नव्हतेच. ते केवळ शेतकऱ्यांची थट्टा व मस्करी करत होते. पण आता रमी खेळणारा माणूस क्रीडामंत्री झाला. अशा पद्धतीने हे सरकार सुरू आहे. आपल्याला या लोकांच्या भ्रष्टाचाराचा विद्रुप चेहरा लोकांपुढे न्यावा लागेल. याविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आपण राज्यात लवकरच हे आंदोलन छेडणार आहोत. तेव्हा सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. एवढा हतबल मुख्यमंत्री पाहिला नाही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. लाडक्या बहिणींची फसवणूक थांबली पाहिजे. मी एवढे हतबल मुख्यमंत्री पाहिले नाही. कुणी कुणाला जाबच विचारू शकत नाही. एखाद्या गोष्टीत एखाद्याला त्रास द्यायचा. त्यानंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण तुमचे कसे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे. आयुष्य समाधानाने सुरू असताना मुद्दामहून कुणाकडून तरी त्यांना त्रास द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे गेलात की सगळे मिटवून टाकायचे. या सगळ्या गोष्टींचा बुरखा आता फाटला आहे. तो आता लोकांपुढे आणण्याची गरज आहे. आज जनतेला कोणताही वाली उरला नाही. त्यामुळे जनतेशी प्रामाणिक राहणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow