रामायणकालीन लाखपुरीतील श्री लक्षेश्वर मंदिर:साडेअकरापैकी अर्धे ज्योतिर्लिंग नदीच्या पैलतिरी, दरवर्षी 6 लाख जण घेतात दर्शन‎

मूर्तिजापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर‎मंदिराला रामायणकालीन महत्त्व‎असून श्रीराम यांच्या बंधूंनी या‎ठिकाणी पूर्णा नदीच्या तीरावर‎लक्षेश्वर महादेवाची स्थापना‎केल्याची आख्यायिका आहे. या‎ठिकाणी साडेअकरा ज्योतिर्लिंग‎असून अर्धे ज्योतिर्लिंग नदीच्या‎पैलतिरी आहे. जर हे पूर्ण बारा‎ज्योतिर्लिंग झाले असते तर या‎ठिकाणाला प्रचंड महत्त्व असते,‎असेही स्थानिक सांगतात.‎ तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री‎लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे‎दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा‎भरते. यात्रेनिमित्त भक्तांची अलोट‎गर्दी असते. लाखोंच्या संख्येने‎भाविक येथे दर्शनाकरीता येतात.‎मनोकामना पूर्ण व्हावी याकरिता‎अभिषेक केला जातो. या गावाचे‎नाव आधी लक्ष्मणपुरी होते.‎कालांतराने लाखपुरी नाव झाले.‎ऐतिहासिकदृष्ट्या लाखपुरी गावाचे‎विशेष महत्व आहे.‎ श्रावण महिन्यातील सोमवारी‎पूर्णा नदीच्या पवित्र जलाने‎महादेवाला अभिषेक करण्याची‎परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे.‎श्रावणात अखंड हरिनाम सप्ताह‎सुरू असतो. दरवर्षी श्रावण‎महिन्याच्या शेवटच्या रविवारी येथे‎मोठी यात्रा भरते. लक्षेश्वर येथून‎पूर्णा नदीचे पवित्र जल कावडीने‎अंजनगाव, दर्यापूर, मूर्तिजापूर‎ तालुक्यासह इतरत्र बऱ्याच ठिकाणचे‎कावडधारी भाविक कावडीद्वारा‎पवित्र जल घेऊन जातात. आपापल्या‎गावात कावड यात्रा आयोजित केल्या‎जाते आणि पूर्णा नदीच्या पवित्र‎जलाने महादेवाला जलाभिषेक‎केल्या जातो.‎ कावडधारी भक्तांसाठी व‎महाशिवरात्रीनिमित्त संस्थेतर्फे‎महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.‎भक्तांनी परिसर फुलून जातो. संपूर्ण‎महाराष्ट्राला कवितांच्या माध्यमातून सुपरिचित‎असलेले कवी उ. रा. गिरी‎लाखपुरी गावातील होते.‎अमरावती विद्यापीठाने बी. ए.‎भाग २ मध्ये त्यांच्या //"मार्गा वरुन‎माझ्या मी एकटा निघालो,‎डोळ्यात चंद्र जखमी मी एकटा‎निघालो'' या कवितेचा‎अभ्यासक्रमात समावेश केला‎आहे. लाखपुरी तीर्थक्षेत्र प्रति काशी‎म्हणून ओळख असणारे गाव‎आहे.‎ श्रावणात येणाऱ्या भाविकांसाठी‎लक्षेश्वर संस्थानकडून विविध उपाय‎योजना करण्यात आल्या आहेत.‎भाविकांकरिता श्रीलक्षेक्ष्वर‎संस्थांनकडून शुद्ध पिण्याचे पाणी,‎वाहन तळ, तैराकी पथक,‎आपत्कालीन पथक, स्वागत कमान‎अशी व्यवस्था केली आहे. कावड‎यात्रेनिमित्त भाविकांना कुठल्याही‎प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून चोख‎व्यवस्था करण्यात येते. रुग्णवाहिका,‎डॉक्टरांचे तपासणी पथक,‎महाप्रसाद, आपत्कालीन पथक‎सज्ज ठेवण्यात येते. कायदा व‎सुव्यवस्था राखण्यासाठी मूर्तिजापूर‎ग्रामीण पोलिस व शहर‎पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येत‎असतो.‎ साडेअकरा ज्योतिर्लिंग असलेले विदर्भातील एकमेव मंदिर‎ साडेअकरा ज्योतिर्लिंग असलेले‎विदर्भातील हे एकमेव मंदिर आहे.‎मंदिरात दगडात कोरलेली‎महादेवाची पिंड, शंकर मंदीर,‎विठ्ठल मंदीर, दत्तात्रेय मंदीर तसेच‎इतरही अनेक मूर्ती व नंदीबैल‎भाविकांना आकर्षित करतात.‎ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे पुरातन मूर्ती‎असलेले मंदिर लाखपुरी येथे आहे.‎

Aug 11, 2025 - 10:03
 0
रामायणकालीन लाखपुरीतील श्री लक्षेश्वर मंदिर:साडेअकरापैकी अर्धे ज्योतिर्लिंग नदीच्या पैलतिरी, दरवर्षी 6 लाख जण घेतात दर्शन‎
मूर्तिजापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर‎मंदिराला रामायणकालीन महत्त्व‎असून श्रीराम यांच्या बंधूंनी या‎ठिकाणी पूर्णा नदीच्या तीरावर‎लक्षेश्वर महादेवाची स्थापना‎केल्याची आख्यायिका आहे. या‎ठिकाणी साडेअकरा ज्योतिर्लिंग‎असून अर्धे ज्योतिर्लिंग नदीच्या‎पैलतिरी आहे. जर हे पूर्ण बारा‎ज्योतिर्लिंग झाले असते तर या‎ठिकाणाला प्रचंड महत्त्व असते,‎असेही स्थानिक सांगतात.‎ तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री‎लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे‎दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा‎भरते. यात्रेनिमित्त भक्तांची अलोट‎गर्दी असते. लाखोंच्या संख्येने‎भाविक येथे दर्शनाकरीता येतात.‎मनोकामना पूर्ण व्हावी याकरिता‎अभिषेक केला जातो. या गावाचे‎नाव आधी लक्ष्मणपुरी होते.‎कालांतराने लाखपुरी नाव झाले.‎ऐतिहासिकदृष्ट्या लाखपुरी गावाचे‎विशेष महत्व आहे.‎ श्रावण महिन्यातील सोमवारी‎पूर्णा नदीच्या पवित्र जलाने‎महादेवाला अभिषेक करण्याची‎परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे.‎श्रावणात अखंड हरिनाम सप्ताह‎सुरू असतो. दरवर्षी श्रावण‎महिन्याच्या शेवटच्या रविवारी येथे‎मोठी यात्रा भरते. लक्षेश्वर येथून‎पूर्णा नदीचे पवित्र जल कावडीने‎अंजनगाव, दर्यापूर, मूर्तिजापूर‎ तालुक्यासह इतरत्र बऱ्याच ठिकाणचे‎कावडधारी भाविक कावडीद्वारा‎पवित्र जल घेऊन जातात. आपापल्या‎गावात कावड यात्रा आयोजित केल्या‎जाते आणि पूर्णा नदीच्या पवित्र‎जलाने महादेवाला जलाभिषेक‎केल्या जातो.‎ कावडधारी भक्तांसाठी व‎महाशिवरात्रीनिमित्त संस्थेतर्फे‎महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.‎भक्तांनी परिसर फुलून जातो. संपूर्ण‎महाराष्ट्राला कवितांच्या माध्यमातून सुपरिचित‎असलेले कवी उ. रा. गिरी‎लाखपुरी गावातील होते.‎अमरावती विद्यापीठाने बी. ए.‎भाग २ मध्ये त्यांच्या //"मार्गा वरुन‎माझ्या मी एकटा निघालो,‎डोळ्यात चंद्र जखमी मी एकटा‎निघालो'' या कवितेचा‎अभ्यासक्रमात समावेश केला‎आहे. लाखपुरी तीर्थक्षेत्र प्रति काशी‎म्हणून ओळख असणारे गाव‎आहे.‎ श्रावणात येणाऱ्या भाविकांसाठी‎लक्षेश्वर संस्थानकडून विविध उपाय‎योजना करण्यात आल्या आहेत.‎भाविकांकरिता श्रीलक्षेक्ष्वर‎संस्थांनकडून शुद्ध पिण्याचे पाणी,‎वाहन तळ, तैराकी पथक,‎आपत्कालीन पथक, स्वागत कमान‎अशी व्यवस्था केली आहे. कावड‎यात्रेनिमित्त भाविकांना कुठल्याही‎प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून चोख‎व्यवस्था करण्यात येते. रुग्णवाहिका,‎डॉक्टरांचे तपासणी पथक,‎महाप्रसाद, आपत्कालीन पथक‎सज्ज ठेवण्यात येते. कायदा व‎सुव्यवस्था राखण्यासाठी मूर्तिजापूर‎ग्रामीण पोलिस व शहर‎पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येत‎असतो.‎ साडेअकरा ज्योतिर्लिंग असलेले विदर्भातील एकमेव मंदिर‎ साडेअकरा ज्योतिर्लिंग असलेले‎विदर्भातील हे एकमेव मंदिर आहे.‎मंदिरात दगडात कोरलेली‎महादेवाची पिंड, शंकर मंदीर,‎विठ्ठल मंदीर, दत्तात्रेय मंदीर तसेच‎इतरही अनेक मूर्ती व नंदीबैल‎भाविकांना आकर्षित करतात.‎ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे पुरातन मूर्ती‎असलेले मंदिर लाखपुरी येथे आहे.‎

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile